Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

नायगाव शहराला पुराने वेढले तर अनेक नगरातील नागरिकांचा रस्त्याविना संपर्क तुटला रस्त्यावर वहाते तीन ते चार फूट पाणी…

 

रघुनाथ सोनकांबळे….

 

नायगाव व परिसरात गेल्या 24 तासापासून धो धो पाऊस सुरू असून नायगाव शहरातील सखल भागातील नगरात पाणीच पाणी साचल्याने अक्षरशा या शहराला मोठ्या तलावाचे रूप आल्याचे चित्र दिसत आहे.
Screenshot 20250828 145921 Whatsappbusiness
Screenshot 20250828 145921 Whatsappbusiness
 या ढगफुटी सदृश्य पुराणे अनेकांचे संसार पुरात वाहून नेले आहे . जर असाच पाऊस पुढे चालू राहिला तर मोठी गंभीर परिस्थिती या शहरात उद्भवू शकते अशी भीती नागरिकात व्यक्त होत आहे. या पूर परिस्थितीमध्ये अनेक सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर येऊन नागरिकांना धिर देण्याचा प्रयत्न करीत आहेत .
Screenshot 20250828 145812 Whatsappbusiness
Screenshot 20250828 145812 Whatsappbusiness
नांदेड जिल्ह्याचे खासदार तथा या शहराचे भूमिपुत्र रवींद्र पाटील चव्हाण हे देखील नायगाव शहरासह या परिसरातील पूर परिस्थिती पाहणे करून या पुरांमधील झालेल्या नुकसानीची सध्या परिस्थितीती पाहून तात्काळ पंचनामे करण्यात यावेत अशा सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.
Screenshot 20250828 145251 Whatsappbusiness
Screenshot 20250828 145251 Whatsappbusiness
अशा गंभीर परिस्थितीत  महसूल विभागाचे संबंधित कर्मचारी तलाठी मंडळ अधिकारी आपापल्या हेडकॉटरला व गावातील ग्रामपंचायत मध्ये उपस्थित राहून त्या त्या गावचा आढावा घेण्याच्या सूचनाही खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिल्या आहेत.
Screenshot 20250828 145713 Whatsappbusiness
Screenshot 20250828 145713 Whatsappbusiness
या पूर परिस्थितीत नायगाव शहरातील अनेकांचे मोठे नुकसान झाले असून  त्यांनाही तात्काळ मदत करणे अत्यंत गरजेचे आहे .तसेच या परिसरातील शेतकऱ्यांचे सुद्धा हजारो हेक्टर वरील पिका होत्यात नव्हते झाले असून शेतकऱ्यावर मोठे संकट या पुरामुळे ओढले आहे. शहरात व परिसरात नुकसान झालेल्यांना तात्काळ मदत करण्यात यावी अशी ही मागणी नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यातून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button