Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

जिओ नेटवर्क बंद पडल्याने नायगाव परिसरातील ग्राहक त्रस्त नेटवर्क समस्या कायम; ग्राहकांचा संताप उसळला

रघुनाथ सोनकांबळे

नायगाव…

नायगाव परिसरात गेल्या आठ दिवसांपासून जिओ नेटवर्क वारंवार खंडित होत असल्यामुळे मोबाईल वापरकर्त्यांत प्रचंड नाराजी पसरली आहे. कोणतेही वेबसाईट उघडत नाही, कॉल वारंवार कट होतात, तसेच इंटरनेट सेवा बंद होत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे तसेच व्यावसायिकांचे कामकाज ठप्प झाले आहे.
या सततच्या नेटवर्क समस्येमुळे ऑनलाईन काम करणारे विद्यार्थी, दुकानदार, तसेच कार्यालयीन कर्मचारी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. मोबाईल शॉपीधारकांनी सांगितले की, ग्राहकांकडून नेटवर्कबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत, मात्र जिओ कंपनीचे अधिकारी याबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलताना दिसत नाहीत.
ग्राहकांनी जिओ कस्टमर केअरशी संपर्क साधल्यावर त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे अनेक ग्राहक आता इतर नेटवर्ककडे वळण्याचा विचार करत आहेत. “नेटवर्क नाही, पण रिचार्ज करा” असे सतत येणारे संदेश पाहून लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
रिचार्ज करूनही दोन ते तीन दिवस नेटवर्क पूर्णपणे बंद राहिल्याने 28 दिवसांच्या प्लॅनमधील चार-पाच दिवस वाया जात असल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे. त्यामुळे नागरिकांकडून जिओ कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून नेटवर्क सुरळीत करावे, अशी मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button